दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना जिल्हा काँग्रेस कमिटीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
लातूर – जम्मू काश्मीर च्या पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निरपराध नागरिकांना लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून लातूरच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक याठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान यावेळी हल्ल्यातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी गोरोबा लोखंडे,प्रा. प्रवीण कांबळे,दगडूप्पा मिटकरी,ॲड देविदास बोरुळे पाटील, व्यंकटेश पुरी,प्रवीण सूर्यवंशी, आसिफ बागवान, नागसेन कामेगावकर,दत्ताभाऊ सोमवंशी,प्रा. सुधीर आणवले,ॲड अंगदराव गायकवाड, तबरेज तांबोळी,भाऊसाहेब भडीकर,बिभीषण सांगवीकर,जमालोद्दीन मणियार,अराफत पटेल,खाजापाशा शेख, पवनकुमार गायकवाड, फारुख शेख,नितीन कांबळे, जुनेद शेख,पिराजी साठे, मारुती चव्हाण,राहुल देशमुख,किरण बनसोडे,बब्रुवान गायकवाड, अहेमद बागवान,करीम तांबोळी,शोभाताई ओहळ यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य,नागरिक उपस्थित होते.

